HW News Marathi
मुंबई

मुंबई विद्यापीठाला ठोकले टाळे

मुंबई – निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपालांनी वाढवून दिलेली ५ ऑगस्टची मुदत उलटून गेली, तरीही मुंबई विद्यापीठाला अद्याप ४७७ कोर्सेसपैकी फक्त २६५ कोर्सेसचे निकाल जाहीर करता आले आहेत. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड कार्यकत्र्यांसह मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्येपोहोचले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.‘मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून निकाल रखडल्यामुळे परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. विद्यापीठाची देशभरात नाचक्की झाली असून आम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत हे सांगताना लाज वाटते’ अशा शब्दात आव्हाड यांनी विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाडे काढले. कुलगुरुंचा राजीनामा मागणाऱ्या शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. त्यांनी आधी उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना मातोश्रीवर बोलावून राजीनामा द्यायला सांगितले पाहिजे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

रखडलेले निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना दिले होते. मात्र ३१ जुलैपर्यंत विद्यापीठाने केवळ १७३ परीक्षांचेच निकाल जाहीर केले. त्यानंतर विद्यापीठाला पाच ऑगस्टची मुदत देण्यात आली आणि आता विद्यापीठाने १५ ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नवे आश्वासन दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दलाल, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

News Desk

राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, शिवडी न्यायालयात हजर राहणार

News Desk