HW News Marathi
मुंबई

‘जय राजस्थान’ चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्मरणशक्तीचे पुस्तके पाठवणार

मुंबई | मीरा-भाईंदर येथे दोन दिवसापूर्वी राजस्थान समाजाचा मेळावा झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी ‘जय राजस्थान’चा नारा तर दिलाच पण, राजस्थान भवनासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भूखंड देण्यात येणार आहे. मनसे पत्रक काढून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा विसर पडला आहे. म्हणून त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्याचा विसरपडल्यामुळे त्यांना स्मरणशक्तीची काही पुस्तके भेट देणार असल्याचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे.’ तर वाशीत महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन कधी करणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच गेल्या १५ वर्षापासून राज्य सरकारने महाराष्ट्र भवनासाठी हा भूखंड आरक्षित असून देखील सुद्धा येथे अजूनपर्यंत भवनाचे भूमिपूजन देखील झाले नाही. पण, राजस्थान भवनासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले. म्हणजे मराठी माणसाला व त्यांच्या मतांना सरकार गृहित धरत असल्याचा काळे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीबद्दल समाधान

Aprna

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

News Desk

मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत

News Desk