Site icon HW News Marathi

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

मुंबई | रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” (Operation Nanhe Farishte) अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत जानेवारी-2022 ते डिसेंबर-2022 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील हरवलेल्या 1399 मुलांची सुटका केली आहे. यामध्ये 949 मुले आणि 450 मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

प्रशिक्षित आरपीएफ जवानांकडून काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मुलांना शोधण्यात येते. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेवर जानेवारी- डिसेंबर- 2022 पासून सुटलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक 615 मुलांची सुटका केली, ज्यात 441 मुले आणि 174 मुलींचा समावेश आहे.
भुसावळ विभागाने 284 मुलांची सुटका केली ज्यामध्ये 150 मुले आणि 134 मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने 285 मुलांची सुटका केली असून त्यात 233 मुले आणि 52 मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागाने 157 मुलांची सुटका केली असून यामध्ये 89 मुले आणि 68 मुलींचा समावेश आहे.
सोलापूर विभागातून बचावलेल्या ५८ मुलांमध्ये ३६ मुले आणि २२ मुलींचा समावेश आहे.

Exit mobile version