HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

मुंबई | तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक 1 ऑक्टोबरपासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. आजपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8.30 ही असेल व प्रति दिवशी 30 लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळविण्यात आले आहे. दिवाळीमुळे 22 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.

राजभवनमधील सरन्यायाधीशांचा सत्कार समारंभ पुढे ढकलला

दरम्यान, राजभवन येथील ११ सप्टेंबर रोजीचा सरन्यायाधीश यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे दुःखद निधनामुळे भारत सरकारने दि. 11 सप्टेंबर, 2022 रोजी संपूर्ण देशभर दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.11 सप्टेंबर, 2022 रोजी मुंबई, राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांनी कळविले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

शिंदे सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

Aprna

‘ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार’, नाना पटोलेंचा थेट हल्ला

News Desk