HW News Marathi
मुंबई

दहावीचा २३ मार्चचा पेपर पुढे ढकलला, ३१ मार्चनंतर पेपरची तारीख करणार घोषित

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा सोमवारी (२३ मार्च) होणारा भूगोलचा पेपर पुढे ढकलण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे. दहावीचा शेवटचा पेपर सोमवारी २३ मार्चला होणार होता. मात्र कोरोनाची संख्या ही देशभरात आणि महाराष्ट्रातही वाढतच आहे. यामुळेच राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून ही परिक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. हा पेपर पुन्हा कधी होणार याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाणार असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

या आधीही १ली ते ८ वीच्या मुलांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून ९वी आणि ११वीच्या परीक्षा लवकरच घेण्यात याव्या याकडे शिक्षणमंत्री आणि शाळाही लक्ष देत आहेत. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने यापूर्वीच दहावी, बारावीच्या १९ ते ३१ मार्च दरम्यान होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

अतिवृष्टीमुळे परीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार

News Desk

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

News Desk