HW News Marathi
मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाकडून बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचा आदेश

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१६ जानेवारी) नववा दिवस आहे. या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या ८ जानेवारीपासून ३२ हजार बेस्ट कामगार संपावर गेले आहेत. बेस्टच्या ३७०० बसेस जागीच उभ्या आहेत. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तरी तोडगा निघणार का ? हा प्रश्न उपस्थित होत होता. मुंबई उच्च न्यायालयात आज सकाळी ११ वाजता झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता बेस्ट कर्मचारी काय भूमिका घेणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

संपात सहभागी झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही

संपात सहभागी झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्याचप्रमाणे एकाही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही, कोणाचाही पगार कापला जाणार नसल्याचे देखील आश्वासन देण्यात आले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

१५ टप्प्यांमध्ये वेतनवाढ लागू करावी, अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून जानेवारी २०१९ पासून १० टप्प्यात वेतनवाढ लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्य मागण्यांसाठी मध्यस्थाची नेमणूक

बेस्ट कर्मचाऱ्यांची १० टप्पयातील वेतनवाढीची प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर बेस्टचे महापालिकेत विलनीकरण आणि खाजगीकरणासारख्या मागण्यांवर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत कर्मचारी संघटनांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत हॉप ऑन– हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ

Aprna

मांजरेकर कॉंग्रेसमध्ये जाणार का ?

News Desk

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

News Desk