HW News Marathi
मुंबई

दोन दिवस धावपट्टी बंद

मुंबई | मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी 9 एप्रिल आणि १० एप्रिल रोजी दररोज सहा तास धावपट्टी बंद ठेवण्याचे निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामुळे सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. यावेळेत येणा-या विमानांच्या वेळेत बदल करून वेळा बदलून त्या दुस-या स्लॉटमध्ये देण्यात आल्या आहेत.

मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीचे काम करण्यात येत असल्याने 8 व 9 एप्रिल रोजीचे औरंगाबाद येथून दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या विमानांसह औरंगाबाद ते मुंबई तसेच मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांनाही दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुस-या क्रमांकाचे अत्यंत वर्दळीचे विमातळ आहे. प्राथमिक धावपट्टी दर तासाला 48 विमाने तर व्दितीय धावपट्टीवर प्रति तास 35 विमानांचे उड्डान होते. सरासरी दररोज या विमानतळामध्ये 9 70 विमानांचे आगमन आणि उड्डान होते. पावसाळ्यानंतर विमान तळाच्या देखभालीसाठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत धावपट्टी पुन्हा एकदा बंद ठेवण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादरमध्ये दिवसाढवळ्या हत्या

News Desk

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या चरणी

News Desk

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk