HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ-कर्जत रेल्वे सेवा विलंबाने सुरू

मुंबई | दिवाळीच्या सुट्टीनंतर आज आज पुन्हा कामावर येण्याचा चाकरमान्यांचा दिवस आहे. यात मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. मध्य रेल्वेची वाहतूक आज (27 ऑक्टोबर) सकाळीसहाच्या सुमारास सीएसएमटीहून कर्जतकडे जाणाऱ्या लोकमध्ये अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.

कर्जतच्या दिशने जाणाऱ्या रेल्वेची सेवा दीड तासा ठप्प झाली होती. यामुळे लोक ट्रेनचे वेळापत्र विस्कळीत झाले होते. कल्याण, डोंबिवली, दीवा आणि ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

दरम्यान, रेल्वे प्रवशासनाने हा तांत्रिक बिघाड दूर केल्याची माहिती मिळली असून मध्य रेल्वेची वाहूतक पूर्ववत करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या लोकल गाड्या आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रखडल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna

मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी घेतला निर्णय

News Desk

लोकलमधील टोळक्याची जेष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

News Desk