HW News Marathi
मुंबई

दहिकाला तीन गोविंदांच्या जीवावर!

मुंबई : उच्च न्यायालयाने थरांच्या उंचीवरील मर्यादा हटविल्यामुळे काल मुंबई- ठाण्यासह राज्यभरात दहिकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण सुरक्षेसंदर्भातील नियम धाब्यावर बसविल्यामुळे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागले आहे. कालचा दहिहंडी उत्सव तीन गोविंदांच्या जीवावर बेतला, तर मुंबई परिसरात ११७ गोविंदा काल जखमी झाले.

नवी मुंबईतील ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या सार्वजनिक दहीहंडी उत्सवात जयेश साईनाथ तारले (३०) या गोविदांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तसेचपालघरमधील धनसार गावात रोहन गोपीनाथ किणी (२१) या गोविंदाचा दहीहंडी फोडताना पडून जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर पुण्यात दहीहंडी फोडून दुचाकीने घरी जात असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका गोविंदाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबई परिसरात काल ११७ गोविंदा जखमी झाले.त्यापैकी तीन गंभीर जखमींना केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

न्यायालयाने बंदी घातली असतानाही कालच्या उत्सवात अनेक ठिकाणी बालगोंविदा थर लावताना दिसून आले. तसेच अनेक बालगोविंदा सेफ्टीबेल्ट, डोक्यावर हेल्मेट न घालताच थरांवर चढत होते. प्रशासनक मात्र याबाबत मूग गिळून गप्प होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

News Desk

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही: राणे

swarit

गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या कॉन्स्टेबलचे निलंबन.

News Desk