HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ब्रेक, वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई । माटुंगा रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतुक १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे. मध्य रेल्वेच्या धाम्या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

परंतु सीएसटीच्या दिशेने जाणा-या ट्रेन वेळेवर सुरू आहेत. कल्याण-डोबिंवली दिशेने जाणा-या ट्रेन उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली आहे. नेमके कोण्या कारणाने मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार

मध्य रेल्वेच्या स्थानकावर अनाऊन्स केले जात होते की, मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. परंतु काही वेळाने पुन्हा एकदा अनाऊन्य करून सांगितले की, मध्य रेल्वेची वाहतुक काही काळासाठी थांबवली आहे. मध्य रेल्वेची वाहतुक किती वेळेसाठी थांबविण्यात आली. या बदल मध्य रेल्वेकडून न सांगितल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

ऑफिसवरुन घरी जाण्याच्या वेळेत मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशा़चे हाल होत आहेत. मुंबईकरांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक २० मिनिटे उशिराने

News Desk

राणीबागेसाठी पेंग्विनचा पायगुण शुभ

News Desk