HW News Marathi
देश / विदेश

खाद्यपदार्थ किती टिकणार, ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक

नवी दिल्ली – कोणताही पाकिटबंद खाद्यपदार्थ कधीपर्यंत खाण्यायोग्य आहे, हे पाकिटावर लिहिणे आता उत्पादकाला बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळेआता प्रत्येक खाद्यपदार्थांच्या वेष्टनावर ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘यूज बायदि डेट’ असे छापणे गरजेचे होणार असल्याची माहिती सरकारनेमंगळवारी संसदेला दिली.

कोणत्या तारखेपर्यंत पदार्थ वापरला जाऊ शकेल ते लिहिणेअनिवार्य करण्यासाठी लीगल मेट्रॉलॉजी (पॅकेज्ड कमॉडिटीज्) कायदा,२०११मध्ये नवी तरतूद करण्यात आली आहे. ही माहिती एका लेखीउत्तरात लोकसभेत केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री सी. आर. चौधरीयांनी दिली. ‘बेस्ट बिफोर’ छापताना खाद्यपदार्थांच्या लेबलवर तारीख, महिना व वर्ष हे तिन्ही उल्लेख असणे गरजेचे आहे. काही काळानंतरमानवी वापरासाठी एखादी वस्तू किंवा पदार्थ अयोग्य होणारा असेल, तर त्यावर असे छापणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात २३ जूनरोजी सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे.

कंपन्यांसाठी प्रत्येक उत्पादनाचे ई-कोडिंग करण्याचे बंधन मात्र सैलकरण्यात आले आहे. या ई-कोडिंगमुळे तयार होत असलेले उत्पादन हेसंख्येमध्ये व गुणवत्तेमध्ये योग्य असल्याची हमी स्वतः उत्पादकालादेता येणार असल्यामुळे ई-कोडिंग करावे, असे सरकारने प्रत्येकउत्पादकाला सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Live Updated Budget 2020 | बेरोजगारीच्या मुद्द्यावर कुठलीच ठास तरतूद नाही, राहुल गांधींची प्रतिक्रिया

swarit

कायद्याप्रमाणे आणि शांततेत सत्तेचे हस्तांतरण झाले पाहिजे, वॉशिंग्टन प्रकरणावर मोदींचे ट्विट 

News Desk

स्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

News Desk