HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप

नवी दिल्ली: राजकारणात मी जी वाटचाल केली आणि माझी जी काही जडणघडण झाली त्यामध्ये संसदेचा वाटा सिंहाचा आहे असं म्हणत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सेंट्रल हॉल सभागृहात उपस्थितांचे आभार मानले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप समारंभ देण्यात आला त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जींना सगळ्या खासदारांच्या सह्या असलेलं एक पुस्तक भेट दिलं. निरोपाचं भाषण करताना प्रणव मुखर्जींच्या डोळ्यात तरल भाव साठले होते.

लोकशाहीच्या मंदिरात अर्थात संसदेत माज्या विचारांना पैलू पडले, मी या संसदेची निर्मिती आहे असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको, २२ जुलै १९६९ हा माझा संसदेतला पहिला दिवस होता. निरोपाचं भाषण करताना मला संसदेतला पहिला दिवस आठवतो आहे, राष्ट्रपती म्हणून मी आता या सभागृहाचा निरोप घेतो आहे हा क्षण माज्यासाठी अविस्मरणिय आहे.

या सभागृहाशी असलेली माझी बांधिलकी याहीपुढे कायम राहिल, १९६९ पासून आजवर या सभागृहात मी अनेक घडामोडी पाहिल्या आहेत. विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही मी पाहिली आहे आणि सत्ताधारी पक्षांचीही भूमिका पाहिली आहे. संसदेतले गदारोळही पाहिले आहेत आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर होणारी एकवाक्यताही पाहिली आहे. मी गेल्या ३७ वर्षांमध्ये अनेक बदल पाहिले आहेत. आता हे सभागृह सोडताना हे सगळं काही माज्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींनी देशासाठी स्थापन केल्या ‘या’ तीन महत्त्वाच्या समित्या

News Desk

…तरीही काँग्रेसचा अहंकार गेलेला नाही! – नरेंद्र मोदी

Aprna

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

News Desk