HW News Marathi
देश / विदेश

खबरदार … शेतक-यांचा संयम सुटतोय

नवीदिल्ली – कर्ज माफीच्या मागणीसाठी तामिळनाडूच्या शेतक-यांवर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर इथे स्वतःचं मूत्र पिण्याची वेळ आली.

कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी महिन्याभरापासून जंतरमंतरवर निदर्शनं करणा-या तामिळनाडूतील शेतक-यांचा संयम आता टोक गाठण्याची शक्यता आहे. याचे उदाहरण सांगायचे झाले तर आपल्या मागण्यांसाठी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करणा-या या शेतक-यांनी आज चक्क मूत्र प्राशन केले आहे. आमच्यामागण्या मान्य झाल्या नाही तर शनिवारी मूत्र प्राशन करणार, मात्र जर याकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले नाही तर रविवारी स्वतःची विष्ठा खाऊन सरकारचा निषेध करू’, अशी धमकीवजा इशारा या शेतक-यांनी दिला आहे.

गेल्या38 दिवसांपासून हे शेतकरी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करत असल्यानं चर्चेत आहे. याआधी मानवी हाडे घेऊन या शेतक-यांनी आंदोलन केले होते. आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे सांगाडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर कधी विवस्त्र होऊन, कधी रस्त्यांवर सांबार-भात खाऊन निदर्शनं केली आहेत, इतकेच नाही तर कधी साप तसेच उंदीर खाऊनही यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शनं केली आहेत. पण सरकारनं अद्यापपर्यंत त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या शेतक-यांचे आंदोलन आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.

दुष्काळामुळेशेतीचं नुकसान झाले, त्यामुळे सरकारने कर्जमाफी द्यावी, आर्थिक मदत करावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. दरम्यान, सरकार आमच्याकडे यासाठी दुर्लक्ष करत आहे कारण त्यांना आम्हाला दिल्लीतून पळवून लावायचे आहे. यापेक्षा आम्हाला अटकच केले तर बरे होईल, अशी भावनादेखील या शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिग-२७ विमान कोसळले, अपघाताच कारण अस्पष्ट 

News Desk

तब्बल १४ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा सुरू

News Desk

शशिकलासाठी जेलमध्ये दोन कोटीचे किचन

News Desk