HW News Marathi
देश / विदेश

भारत- चीनमध्ये युद्धाची शक्यता नाहीच!

नवी दिल्ली – पूर्व सिक्कीम भागात भूतानजवळच्या डोकलाम पठारावर सध्या भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे आहे. मात्र परिस्थिती इतकी बिघडत असतानाही भारतीय सैन्याने अद्याप तेथे तोफखाना दल तेथे तैनात केलेले नाही. याचाच अर्थ भारत आणि चीन दोघांकडूनही या प्रश्नावर युद्धाने नव्हे, तर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी केली जाते आहे, असे सूत्रांनी सांगितले.

१९६२ च्या भीषण युद्धानंतर दोन्ही देशांना आता शांतता हवी आहे. त्यामुळे डोकलामसारख्या प्रश्नावर शस्त्रशक्तीऐवजी चर्चेतून तोडगा काढण्याची उभय देशांची तयारी आहे. म्हणूनच युद्ध वल्गना केल्या जात असल्या, तरीही सीमेवर दोन्ही बाजूने युद्धाची विशेष तयारी सुरू नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या सीमेवर ना युद्ध, ना शांतता अशी स्थिती आहे. म्हणूनच फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या पाठबळासाठी अद्याप लष्कराने तोफखाना तैनात केलेला नाही. तसेच या भागात पाठविण्यात आलेल्या प्रत्येकी ४ हजार सैनिकांच्या दोन ब्रिगेड्सही अद्याप सीमेवार तैनात करण्यात आलेल्या नाहीत, त्या अद्यापही नियमित सराव करीत आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, सीमेवर युद्धाचे ढग जमल्याचे भासत असले, तरीही प्रत्यक्ष हातीघाई होण्याची शक्यता अजिबातच नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अलास्कात ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती…!

News Desk