HW News Marathi
देश / विदेश

मी बाराशे कायदे कालबाह्र केले, आणखी करणार- मोदी

वृत्तसंस्था। केंद्र सरकारने २०१४ पासून आतापर्यंत १२०० कालबाह्य कायदे संपुष्टात आणले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात बोलताना म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान बोलत होते.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत लोक मला फारसे ओळखत नव्हते. त्यावेळी एकदा जाहीर कार्यक्रमात मला, तुम्ही सत्तेत आल्यावर किती कायदे करणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मी किती कायदे करेन, हे माहित नाही. मात्र, मी दर दिवशी एक कायदा रद्द करेन, असे म्हटले होते आणि आम्ही आतापर्यंत १२०० कालबाह्य कायदे संपुष्टात आणले आहेत,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

कायदा हा सर्वांसाठी समान असायला हवा व सर्वांना न्याय मिळाला पाहीजे. कायद्यामुळे फक्त श्रीमंतांनाच न्याय मिळू नये, तर गरिबांनाही कायद्यामुळे त्यांचे हक्क मिळावेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात म्हटले. प्रत्येक निर्णयामुळे समाजातील गरिबांना आणि वंचितांना लाभ व्हायला हवा, असे ते म्हणाले.

न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होण्याची गरज या वेळी मोदींनी व्यक्त केली. ‘कैद्यांना न्यायालयात आणण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांची जबानी नोंदवली जाऊ शकते. यासारख्या कल्पनांवर काम करून स्टार्ट अप कंपन्या न्यायव्यवस्थेला मदत करु शकतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था बळकट करता येऊ शकते, असेही प्रतिपादन या वेळी मोदी यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रोनच्या हल्ल्यात केरळच्या युवकाचा मृत्यू

News Desk

दिलासादायक! देशातील ४५ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही

News Desk

मायावतींची राजकीय कारकीर्द धोक्यात ?

News Desk