HW News Marathi
देश / विदेश

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर सर्वस्तरावरून टीकेचा वर्षाव

शुभम देशमाने

नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास अर्धी, म्हणजे 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग आजपर्यंत नाही. ” बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली .मात्र या वक्त्यव्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर सर्व स्तरातून टीकेचा वर्षाव सुरू झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या टीकेच्या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृह सोडलं . त्यामुळे काही काळासाठी मोदींना भाषण थांबवावं लागलं. या वक्तव्यामुळे सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी याबाबत गंभीर निषेध व्यक्त होत होते. एवढच नाही तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या टीकेला अगदी अपमानास्पद म्हणून याचा निषेध केला तर मोदींनी या सर्व प्रकरणी माफी मागावी असेही सूर आता निघत आहेत. या प्रकरणामुळे काँग्रेसने उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत बहिष्कार कायम राहिल,अशी भूमिका काँग्रेस खासदारांनी घेतलीय.

हे सर्व होऊनही माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी , ”या वक्तव्यावर आपण काहीही बोलणार नाही”, असं स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवाद्याचे चिथावणीखोर भाषणाचे 25 तास प्रसारण

News Desk

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

News Desk

नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे पुढारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

News Desk