HW News Marathi
देश / विदेश

सुषमा स्वराज खोटारड्या आहेत, चीनचा आरोप

वृत्तसंस्था- सिक्कीम जवळच्या डोकलाममध्ये भारत-चीनमध्ये सुरु असलेला संघर्ष चिघळत चालला असून, ग्लोबल टाइम्सच्या लेखातून भारताला पुन्हा एकदा युद्धाची धमकी देण्यात आली आहे तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना लक्ष्य करण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांनी चुकीची माहिती दिली असून त्या देशाच्या संसदेत खोट बोलल्या असे या लेखात म्हटले आहे.

सुषमा स्वराज यांनी गुरुवारी सिक्कीममधल्या परिस्थिती संदर्भात संसदेत माहिती दिली. चीनकडून युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपले संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत गुरुवारी स्पष्ट केले. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात, त्या ट्राय जंक्शनच्या भूभागातील परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारत-चीन संघर्षात अनेक देश भारताला पाठिंबा देत असल्याचे त्या म्हणाल्या. पण प्रत्यक्षात भारताला एकाही देशाचा पाठिंबा नाही. भारताच्या डोकलाममधील भूमिकेने आंतरराष्ट्रीय समुदायाला धक्का बसला आहे. भारताने चीनच्या प्रदेशात घुसखोरी केलीय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला, लवकरच कळेल मध्यस्ती होणार की नाही?

Atul Chavan

खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या असा उल्लेख करू शकलो असतो पण…पडळकरांचे राऊतांना पत्र

News Desk

नाणार प्रकल्प महाराष्ट्रातून जाऊ नये पण… शरद पवार

News Desk