HW News Marathi
देश / विदेश

#26/11Attack : २६/११ च्या कटू आठवणी, असा झाला होता दहशतवाही हल्ला…

मुंबई | २३ नोव्हेंबर २००८ ला १० दहशतवादी पाकिस्तान मधून भारताच्या दिशेने यायला निघाले. त्यांच्या हेतूविषय सतत कामात व्यस्त असलेल्या मुंबईकरांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. २६ नोव्हेंबर ला रात्री ८.३० वाजता हे दहशतवादी मुंबईत दाखल झाले आणि सुरुवात झाली एका भयान थरारक नाट्याला.

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल, नरीमन हाउस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा अनेक गर्दीच्या आणि धावपळीच्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात १६६ नागरीक जागीच मृत्यूमुखी पडले आणि ३०० हून अधिक नागरीक जखमी झाले. या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन, हेमंत करकरे, विजय साळस्कर यांसारख्या अनेक साहसी विरांच्या जिवाला महाराष्ट्र मुकलो. हा हल्ला भारताला खूप मोठी शिकवण देऊन गेला आणि त्यामुळेच मुंबई पोलिसांनी आजपर्यंत मुंबईच्या समुद्र किना-यावरच्या सुरक्षेत वाढ केली.

२६/११ च्या या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागरी कवच ही सुरक्षा मोहीम सुरु केली. हा हल्ला झाल्यानंतर १ वर्षातच म्हणजेच २००९ साली सागर कवच मोहीम सुरु झाली. तटरक्षक दल भारतीय नौदल आणि मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा विभागाने यामध्ये सहभाग घेतला. या मोहीमेत दोन गट बनविण्यात आले ज्यामध्ये लाल गट हा बनावट दहशत वाद्यांची भूमिका निभावतो तर निळा गट सुरक्षा रक्षकांची भूमिका निभावतो. लाल गटाला सुरक्षा भंग करण्याचे काम सोपविण्यात येते. तर निळ्या गटाला या बनावट दहशतवाद्यांना शोधून थांबविण्याचे कार्य सोपविण्यात येते. सदर मोहिम सर्व राज्यांमध्ये राबविली जात आहे.

अशा प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकार विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. कारण, भारतातील नागरीकांची सुरक्षा सर्वोतपरी आहे. २६ नोव्हेंबर २००८ सारख्या घटना पुन्हा वारंवार घडू नयेत . या देशाला जे २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यात भोगावे लागले आहे ते पुन्हा भोगायला लागू नये यासाठी सरकारने देखील आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दहशतवादाला उत्तर द्यावेच लागणार. प्रशासन तर प्रशासनाच्या पातळीवर काम करेलच परंतु सामान्य नागरीकांनीही सतर्क, सजग रहाणे गरजेचे आहे तरचं दहशतवादाला चोख उत्तर मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोएडामधील पार्कात नमाज पठण करण्यास पोलिसांची मनाई

News Desk

कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे सिद्धरामय्यांची मागणी

News Desk

तीन वर्षाच्या मुलाची दहशतवादी हल्ल्यापासून केली सुटका

News Desk