HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणामधील कोंडागट्ट घाटात बस कोसळून ४५ प्रवाशांचा मृत्यू

जगतियाल | तेलंगणामधील जगतियालमध्ये आज (११ सप्टेंबर) रोजी बसचा भीषण अपघात झाला आहे. कोंडागट्ट घाटात राज्य परिवहन निगमची बस उटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या अपघातात आतापर्यंत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.

या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस हनुमान मंदिर येथून जगतियाला जात असताना रस्त्या येणाऱ्या कोंडागट्टच्या घाटात हा अपघात झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला असून अपघातात मृतांच्या नातेवाईकांना सरकार पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

News Desk

ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार, भारत-अमेरिका संबंध धोक्यात ?

News Desk

उत्तर प्रदेशात सपा-राष्ट्रवादी एकत्र ,या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, राऊतांचा सवाल

News Desk