HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे ५४ हजार नागरिक बेघर

केरळ | मुसळधार पावसामुळे केरळ राज्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसाने केरळमधील धरणे आणि तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊड पडत असल्यामुळे जवळपासू ५४ हजार नागरिक बेघर झाले आहेत.

या मुसळधार पावसामुळे २९ नागरिकांचा मृत्यू झाला असून या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले. तर केरळमधील १४ जिल्ह्यात पुर जन्य परिस्थिती आहे. या पुरात आडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सैनिकांच्या पाच तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.

इडुक्‍की, वयनाड, मलप्‍पुरम, कोझीकोड, पालक्‍काड, कोट्टायम आणि अलाप्‍पुझा या जिल्‍ह्यांना पुराच्या पाण्याने वेढाल्यामुळे हवामान खात्याने या १४ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पेरियार नदीला पूर आल्यानंतर नौदलच्या तुकडीकडून सतर्कतेचा इशारा दिला असून कोच्ची, वेलिंगडन हे परिसर पूर्ण पाण्याखाली गेले आहेत.

राज्यातील एकूण ४० नद्या पाण्याखाली आहेत. केरळमध्ये आलेल्या परदेशी पर्यटकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. ५० पर्यटकांपैकी २४ पर्यटकांना सुरक्षित स्‍थळी पोहचवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे आयएसआय !

News Desk

CTET परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

Aprna

एका सच्च्या पत्रकाराचे पंतप्रधानांना पत्र

News Desk