HW News Marathi
देश / विदेश

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवाही ३ मेनंतर सुरू होणार

मुंबई। देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन आता ३ मेपर्यंत वाढविण्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ एप्रिल) दिली. यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.

‘भारतीय रेल्वेवरील सर्व प्रीमियम गाड्या, मेल/एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वे इत्यादींसह सर्व प्रवासी रेल्वेसेवा ३ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत रद्द राहतील.’ असे ट्वीट रेल्वे मंत्रालयाने केले आहे.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सर्व नियोजित विमानसेवा ३ मे रोजी रात्री ११: ५९ पर्यंत रद्द करण्यात आल्याचे ‘डीजीसीए’ने जाहीर केले.य, ही माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

आज देशातील करोनाबाधितांची संख्या १०३६३ वर पोहचली आहे. यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील सध्या ८९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. करोनामुळे ३३९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत तर १०३६ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसच्या मानसिकतेवर टीका करत मोदींनी लोकसभेत सांगितला एक किस्सा

News Desk

अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

News Desk

भारतीय सुरक्षा दलाने निष्पाप काश्मीरमधील नागरिकांना मारले !

swarit