HW News Marathi
देश / विदेश

अटकपूर्व जामीन हवा असेल तर, केरळ पूरग्रस्तांना मदत करा | न्यायालय

राची | अटकपूर्व जामीन हवा असल्यास केरळमधील पूरग्रस्तांना मदत करा, केरळ मुख्यमंत्री मदत निधीमध्ये ठराविक रक्कम जमा करा, असे आदेश झारखंड उच्च न्यायालयाने तीन आरोपींना दिले आहेत. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे केरळ राज्याला मदतीची गरज असल्यामुळे न्या. ए. बी. सिंह यांनी तीन आरोपींना पूरग्रस्तांना मदत करणयाच्या सूचना केल्या आहेत.

झारखंड उच्च न्यायालयाने तीन आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यासाठी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याची अट घातली आहे. न्या. सिंह यांनी आरोपी उत्पल रायला यांनी अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी केरळ मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये ७ हजार रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. उत्पल राय यांच्यावर फसवणुकीवर गुन्हा दाखल होता.

त्या व्यतिरीक्त ज्ञानेश्वर मंडल आणि संभू मंडल यांनाही अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत, राऊतांची जोरदार बॅटिंग

News Desk

अमित शहांना गृहमंत्री पदावरून हटवा, राष्ट्रपतींकडे सोनिया गांधींची मागणी

swarit