HW News Marathi
देश / विदेश

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद | अयोध्यातील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज (९ नोव्हेंबर) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालाचे देशभरातून स्वागत होत असतानाच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हा निर्णय अमान्य केला आहे. ओवेसी म्हणाले की, “मी सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयाने समाधानी नाही. ज्यांनी बाबरी मशिद पाडली, न्यायालायने त्यांनाच ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिला. बाबरी मशिद पाडली नसती तर न्यायालयाने काय निर्णय दिला असता?”, असा उलट सवाल ओवेसींनी उपस्थित केला. ओवेसी यांनी अयोध्या निकालानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. यावर ओवेसींनी प्रतिक्रिया दिली की, “मुस्लिमांसोबत अत्याचार झाला आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. “मुस्लीम गरीब आहेत, पण ते पाच एकर जमीन विकत घेऊ शकत नाहीत, आम्हाला कुणाच्याही भिकेची गरज नाही. पाच एकरची ऑफर रिजेक्ट करावी.” ओवेसी पुढे म्हणाले की, “मी जर हैदराबादमध्ये फिरलो तर माझ्या झोळीत जेवढे पैसे जमा होतील तेवढ्यात मी ५ एकर जमीन घेईल. आम्हाला कुणाच्याही भिकेची गरज नाही.” या राष्ट्राची वाटचाल आता हिंदू राष्ट्राकडे होत आहे. परंतु आम्ही भारताचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू, असे ओवेसी म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप बंद

swarit

डाॅ. मधुकर गायकवाड हे “राष्ट्रीय गौरव अवार्ड”ने सन्मानित

News Desk

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना

News Desk