HW News Marathi
देश / विदेश

भारत बंदला काही राज्यांमध्ये यश….

दिल्ली | शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबंदचा परिणाम पंजाब, हरयाणा, पश्चिम उ. प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने दिसून आला. तर केरळ, बिहार, झारखंड, प. बंगाल व ओदिशा येथे काही ठिकाणी शेतकर्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. काही संघटनांकडून रेल्वे रोकोही झाला. त्यामुळे २५हून अधिक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. शेतकर्यांनी दिल्ली, अंबाला व फिरोजपूर रेल्वे विभागात रेलरोको केले. त्यामुळे दिल्ली-अमृतसर शान-ए-पंजाब, नवी दिल्ली-मोगा एक्स्प्रेस, पठाणकोट एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, अमृतसर शताब्दी एक्स्प्रेस या रेल्वे थांबून राहिल्या होत्या.

आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत पण सरकार त्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप

मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध म्हणून सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारतबंदचे पडसाद काही राज्यात दिसून आले. सोमवारी सकाळपासून पंजाब, हरयाणा, दिल्लीतील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले व त्यांनी रास्ता रोको केले. यामुळे राजधानी नवी दिल्लीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झालेला दिसून आला. भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकर्यांच्या भारतबंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. आम्हाला देशातील सर्व थरातील शेतकर्यांकडून पाठिंबा मिळाला. आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत पण सरकार त्याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप टिकैत यांनी केला.

महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी शेती कायद्यांविरोधात मोर्चा काढला. या भारतबंदला सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. पण शिवसेना या बंदबाबत तटस्थ राहिली.राजस्थानात गंगानगर, हनुमानगड, बिकानेर, सिकार, नागौर येथे भारतबंदचा परिणाम दिसून आला. येथील स्थानिक बाजारपेठा बंद होत्या. जयपूरमध्ये भारतीय किसान युनियनने मोर्चा काढला होता.

 

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार निवडणूकीत कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान!

News Desk

चांद्रयान – २ मोहिमेसाठी ऐतिहासिक दिवस, मध्यरात्रीनंतर चंद्रावर उतरणार

News Desk

कॅन्सरसारख्या असाध्य रोगालाही प्रदूषणाच्या बळींनी मागे टाकले !

News Desk