HW News Marathi
देश / विदेश

बिहारमध्ये मॉब लिंचिंग, पोलिसांनी १५० जणांविरोद्धात केला गुन्हा दाखल

पाटणा | बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील एक तरुण आजीच्या वर्षश्राद्धसाठी सामान आणायला जात असताना जमावाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिहारमध्ये मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. त्यामुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सिगंहरिया गावाचा रहिवासी असलेला रुपेश झा हा त्याच्या आजीच्या वर्षश्राद्धाचे सामान आणण्यासाठी निघाला होता. सामान आणायला जात असताना पिक-अपच्या चालकासोबत किरकोळ वादा झाला. या वादाचे रुपांतर वादात झाले असून यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमली असून कोणताही विचार न करता रुपेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांनी कोणताही विचार न करता, रुपेशला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. रुपेशने आरडाओरडा केल्यानंतर ही जमावाने मारहाण न थांबविली नाही.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुपेश गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुपेशची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारसाठी शहरातील पीएमसीएचतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्तीसगडमध्ये २०० गोमातांचा भूकबळी

News Desk

ट्रम्पनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ‘या’ गोष्टीसाठी भारताचे मानले आभार

News Desk

देशभरात आज ईदचा उत्साह !

News Desk