HW News Marathi
देश / विदेश

“…मग शुद्राला शुद्र म्हटले तर वाईट का वाटते ?”, प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा बरळल्या

नवी दिल्ली । भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अद्यापपर्यंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. मध्य प्रदेशातील सेहोरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वर्ण व्यवस्थेवर वादग्रस्त भाष्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. “ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटले तर वाईट वाटत नाही. पण, शुद्राला शुद्र म्हटले तर वाईट वाटते. याचे कारण काय तेच समजत नाही”, असा प्रश्न प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उपस्थित केला.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे की, “क्षत्रियाला क्षत्रिय म्हटले तर त्याला वाईट वाटत नाही. ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटले तर वाईट वाटत नाही. वैश्याला वैश्य म्हटले तर वाईट वाटत नाही. मात्र, शुद्राला शुद्र म्हटले की वाईट वाटते. कारण काय आहे? ते समजू शकत नाही.” खरंतर प्रज्ञा सिंह ठाकूर या अशाच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहिल्या असून पक्षालाही अडचणीत आणत राहिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Amritsar : अमृतसरच्या अपघातात ५० हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

News Desk

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

News Desk

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल हा ट्रेंड आहे | शरद पवार

News Desk