HW News Marathi
देश / विदेश

निर्मला सीतारमण यांनी बजेटमधील शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवली

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकप्ल सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली. तसेच अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करण्यापुर्वी, भारताच्या जनतेने नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केलं आहे. हा तुमच्या उद्दीष्ट, आकांक्षा आणि अपेक्षांचा अर्थसंकल्प आहे असेही त्यांनी या भाषणात म्हटले.

दरवर्षीच्या बजेटमध्ये शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत अर्थसंकल्प सादर करण्यापुर्वी सीतारमण साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी पंडित दिनानाथ कौल यांची काश्मिरी कविता वाचली. अर्थमंत्र्यांनी या कवितेला काश्मिरा भाषेत वाचलं आणि त्यानंतर हिंदीमध्ये त्याचा अर्थही सांगितला,

“हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसा

हमारा वतन डल लेक में खिलते हुए कमल जैसा

नौजवानों के गर्म खून जैसा

मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन

दुनिया का सबसे प्यारा वतन”

निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तीन महत्त्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या. यामध्ये महत्वाकांक्षी भारत, सुरक्षित समाज आणि आर्थिक विकास यांचा समावेश होता. या आर्थिक संकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना सरकार घेऊन येणार आहेत. मोदी सरकारने २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी १६ कलमी विशेष कृती योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेसाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २०२०-२१ पर्यंत १५ लाख कोटींच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १६ सूत्री कार्यक्रमात सेंद्रीय खतांवर भर, सौर पंप, शेतीवर गुंतवणूक, एक वस्तू, एक जिल्हा, जैविक शेती, झीरो बजेट या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात घुसखोरी करण्यासाठी ३०० दहशतवादी प्रयत्नशील | लष्करप्रमुख

News Desk

आग्रा शहराचे नाव बदलण्याची मागणी

swarit

“राफेल घोटाळ्याची चौकशी टाळून मोदी सरकार कोणाला वाचवतय ?” काँग्रेसचा बोचरा सवाल

News Desk