HW News Marathi
देश / विदेश

दिल्ली विधानसभेचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता लागू

नवी दिल्ली | महाराष्ट्र आणि हरियाणानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज (६ जानेवारी) पत्रकार परिषद आयोजित केली. यात निवडणूक आयोगाने दिल्लीत आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान ८ फेब्रुवारीला एका फेरीत होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची मतमोजणी होणार आहे. दिल्लीत आता जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांची संख्या असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोगाने सुनील आरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

”दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना १४ जानेवारी रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. तर निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी २२ जानेवारीला होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी आहे,” असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

Chetan Kirdat

केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार !

News Desk

आधी रुग्णालय आणि नंतर संसद भवन उभे करावे, खासदार अमोल कोल्हेंनी राष्ट्रपतींना सुनावले

News Desk