Site icon HW News Marathi

मानहानी प्रकरण: राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सूरत सत्र न्यायालयाकडून मानहानी प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानहानी प्रकरणात 13 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून कर्नाटकमध्ये वक्तव्य केले होते. आणि राहुल गांधीच्या मोदी आडनावाच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सूरत सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या आधारावर राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. या शिक्षेविरोधात राहुल गांधींनी शिक्षेविरोधात सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.  या याचिकेवर आज (3 एप्रिल) सुनावणी झाली.  या सुनावणीत राहुल गांधींना सूरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

दरम्यान, या प्रकरणावर 13 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर राहुल गांधींना दिलेल्या शिक्षेला पुढच्या सुनावणीत स्थगिती मिळाली. तर लोकसभा खासदारकी रद्द करण्याची जी कारवाई आहे. ती मागे घेतला जाऊ शकतो.

नेमके काय आहे प्रकरण

काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी कर्नाटकात प्रचारासाठी गेले असताना ‘मोदी’ आडनावावरून टीका केली होती. “सर्वच चोरांचे नावे ही मोदी का असतात. यात नीरव मोदी, ललित मोदी अशी नावे घेतली,” असे विधान राहुल गांधी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधीच्या विधानाचा आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी त्यांच्याविरोधात  सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.

संबंधित बातम्या

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Exit mobile version