HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली, राहुल गांधीनी मोदींना सुनावले  

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) सादर केला. हा अर्थसंकल्प कठीण काळात तयार करण्यात आला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली असून, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन, सरकारी योजना, धोरणे यांवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तर, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह दोन जण दोषी, तर दोघांची सुटका

News Desk

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित न करता आल्याचा दोष ‘काँग्रेस’वर

News Desk

देशात पहिल्यांदच केली जाणार ‘श्रमगणना’

News Desk