HW News Marathi
देश / विदेश

संघ आणि भाजपची साथ सोडा,देशाला बरबाद होण्यापासून वाचवा, कॉंग्रेसची नितीश कुमार यांना ऑफर

पाटणा | बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शेवटी एनडीएचेच सरकार स्थापन झाले. चुरशीच्या या लढाईत एनडीएने बाजी मारली. एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला कमी जागा मिळाल्या असल्या तरी तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. अशात काँग्रेसकडून नितीश कुमार यांना भाजपची साथ सोडण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत नितीश कुमार यांना सावध होण्याचा सल्ला दिला आहे. “भाजपा/संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात, ते झाड वाळून जात आणि वेल मात्र वाढीस लागते. नितीशजी, लालूजींनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजपा-संघाची विचारधारा सोडून तेजस्वींना आशीर्वाद द्या. या अमरवेली रुपी भाजपा-संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका,” असा राजकीय सल्ला देत काँग्रेसनं राजदसोबत येण्याची ऑफर दिली आहे.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अमरवेलीप्रमाणे आहेत. ज्या झाडावर ही वेल लपेटली जाते ते झाड सुकून जाते आणि ही अमरवेल वाढत जाते. ही अमरवेल बिहारमध्ये वाढून देऊ नका. तुम्ही लालू प्रसाद यादव यांच्यासोबत अनेक आंदोलने आणि संघर्ष केलाय. त्यासाठी तुम्ही एकत्र तुरुंगातही गेला आहात. त्यामुळे आता भाजप आणि संघाची ही विचारधारा सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

तुम्ही महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे नेते आहात. जनसंघातही द्विराष्ट्रवादाच्या मुद्द्यावरच फूट पडली होती. त्यामुळे आता तुम्हीही संघ आणि भाजपची साथ सोडा. देशाला बरबाद होण्यापासून वाचवा, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी १२५ जागांवर एनडीए तर ११० जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले. यामध्ये नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या (JDU) अवघ्या 43 आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा राहील, हे स्पष्ट झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये !

News Desk

चीनला भिडण्यासाठी नौदलाची नवी पाणबुडी

News Desk

“एक आदिवासी मुख्यमंत्री असल्यामुळे त्रास देत आहेत”, हेमंत सोरेन यांचा आरोप

Aprna