HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनातून बरे होण्याचा दर ७५ टक्के – डॉ हर्षवर्धन 

नवी दिल्ली | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी लोकांना कोरोनाला घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनातून बरे होण्याचा दर जवळपास 75 टक्के इतका आहे आणि यात दररोज वाढ होत आहे. भारतातील मृत्यूदरही सर्वात कमी १.८७ टक्के आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. ८ महिन्यांच्या लढाईनंतर भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वात उत्तम 75 टक्के आहे. 22 लाख रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर सध्या सात लाख रुग्णांवर उपचार सुरु असून तेदेखील लवकरच बरे होतील, असा विश्वासही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारत दर एक लाख लोकसंख्येवर सुमारे ७४.७ लोकांची चाचणी करत आहे. जे प्रति एक लाख लोकसंख्येवर.14 लोकांची चाचणी करण्याच्या WHOच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने एक नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात एका दिवसात 10 लाखहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं की, शुक्रवारी जवळपास 10 लाख 23 हजार 836 चाचण्या करण्यात आल्या. हा रेकॉर्ड असून आतापर्यंत देशात जवळपास 3.4 कोटीहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, चाचणी प्रयोगशाळांच्या वाढत्या नेटवर्कमुळे हे यश शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यात २७ जानेवारीपासून सुरू होणार प्रत्यक्ष शाळा

News Desk

राज्यकर्ते अनाथ मुलांसाठी काय करू शकतात शिवराजसिंह चौहान सरकारने दाखवले!

News Desk

“ कोरोना बाबतीत अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा”

News Desk