HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात रामलीला मैदानात ‘भारत बचाव रॅली’ आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचित पाटलेट, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सगळेच नेते या भव्य रॅलीला उपस्थित आहेत.

या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी केली आहे. रामलीला आणि दिल्लीत सर्वत्र काँग्रेसचे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले आहेत. एकप्रकारची वातावरण निर्मिती काँग्रेसकडून केली जात आहे. रामलीला मैदानात काँग्रेसचे झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टर्सवर सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो दिसत आहेत. मोदी सरकारविरोधात आज (१३ डिसेंबर) दुपारी काँग्रेसकडून हे आंदोलन केले जाणार आहे. दुपारी १२ वाजताची या आंदोलनाची वेळ आहे. भाजपच्या हुकूमशाही सरकारविरोधात दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने सुरु केलेली तानाशाही चालणार नाही, असे ट्वीट राहुल गांधींनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संयुक्त राष्ट्र संघात फ्रान्स ‘मसूद अझर’वर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडणार

News Desk

याला म्हणतात लढाई… संजय राऊत यांनी केलं प्रियंका गांधींचं कौतुक

News Desk

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk