HW News Marathi
देश / विदेश

अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कारानं गौरव

नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाचं विंद कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनामध्ये आज (२२ नोव्हेंबर) पुरस्कार सोहळा पार पडला आहे.

काश्मीरच्या पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. हा दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून केल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भारतानं फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले होता.

पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय जवानांवर आझम यांचे अप्रत्यक्ष गंभीर आरोप

News Desk

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहा:कार

swarit

“जान भी है और जहान  भी है”, पंतप्रधानांनी दिले सर्व मुख्यमंत्र्यांना लढण्याचे बळ

News Desk