HW News Marathi
देश / विदेश

अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

मुंबई | अखेर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेस मोठा धक्का मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. अखरे हार्दिक पटेल यांनी आज (१८ मे) काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेलने त्यांचा राजीनामा दिल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. “आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,” असे ते ट्वीट करत म्हणाले.

हार्दिक पटेल ट्वीट करत म्हटले, “आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.” हार्दिक पटेल यांनी ट्वीटसोबत पक्षला पाठवलेले पत्र देखील ट्वीट केले आहे. 

हार्दिक पटेल यांनी पत्रकात नेमके का लिहिले

भारत हा जगातील युवा देश आहे. तर आपल्या देशाला एक सक्षम आणि कणखर नेतृत्वाची गरज आहे. गेल्या ३ वर्षापासून मी काँग्रेसमध्ये पाहिले की, फक्त विरोधाचे राजकारण केल जात आहे. परंतु, देशातील लोकांना विरोध नको तर एक पर्याय हवावा आहे. जे देशाच्या भविष्याचा विचार करून पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे. देशात सीएए, एनआरसी, अयोध्येतील राम मंदिर आणि, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०  आणि जीएसटीसंदर्भात निर्णय असो. या सर्व गोष्टींवर मार्ग काढता आला असता. परंतु, काँग्रेसने केवळ अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे. काँग्रेस हे देशसह गुजरातमध्ये प्रत्येक मुद्यावर काँग्रेस फक्त केंद्र सरकारचा विरोध करण्याऐवढीच मर्यादित आहे. देशभरातील प्रत्येक राज्याने काँग्रेसचे नेतृत्व नाकारला आहे. जेव्हा पक्षातील श्रेष्ठींशी कोणत्याही मुद्यासंदर्भात गांबीर्याने बोलायला जातो. तेव्हा मोबाई आणि अन्य गोष्टींवर जास्त लक्ष देत असतात. जेव्हा आपल्या देशात एखादे संकट असते, तेव्हा आमचे नेते हे परदेशात जातात. पक्ष श्रेष्ठी हे गुजरातमधील लोकांबद्दल ते द्वेषाने वागतात. तसेच पक्षाचे कार्यकर्ते स्वत:च्या खिशातून गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमीचा प्रवास करतात. जनतेमध्ये जावून लोकांशी संवाद साधतात. परंतु, गुजरातमधील मोठे नेते हे दिल्लीतून आलेल्या नेत्यांची करत असून दिल्लीच्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का?, याकडे त्यांचे लक्ष लागलेले असते. जो पक्ष गुजराती लोकांचा सन्मान करत नाही, आपण अशा पार्टीत का आहोत?, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जातो. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून २७ प्रवाशी ठार

News Desk

देशात कोरोनामुळे आतापर्यंत १६६ जणांचा बळी, तर ४७३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk