HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत हाय अलर्ट ! रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या मुंबई लोकल आणि रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

येत्या ३ महिन्यांमध्ये मुंबईतील रेल्वे स्थानकांवर दहशवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. दशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथील समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

कर्जतमधील आपटा वस्तीतील एसटी बसमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) बाँम्बसदृश्य वस्तू सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा बॉम्ब निकामी करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून हा आयईडी बॉम्ब असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रायगडमध्ये देखील हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1 मे नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या लाल दिवा काढणार

News Desk

भारताचे पायलट्स पाकिस्तानच्या ताब्यात, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली

News Desk

अखेर विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

News Desk