HW News Marathi
देश / विदेश

तुम्ही हल्ला केलात तर आम्हीही गप्प बसणार नाही | इम्रान खान

नवी दिल्ली | “भारतातील माध्यमे, राजकारणी लोक पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप आमच्यावर करीत आहेत. मात्र, कोणत्याही पुराव्यांअभावी, न्यायव्यवस्थेच्या वर जाऊन तुम्ही आमच्यावर हे आरोप कसे काय करू शकता ?”, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. “भारताने जर आमच्यावर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही विचारही करणार नाही. आम्ही थेट प्रत्युत्तरच देऊ”, असेही इम्रान खान यांनी यावेळी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील १४ फेब्रुवारीला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“लढाई सुरू झाली तर ती कुठल्या स्तरावर जाईल हे अल्लाच जाणतो. तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान केवळ विचार करणार नाही तर थेट प्रत्युत्तर देईल. भारतात सध्या निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे असा प्रचार केला जात असेल”, असेही इम्रान खान यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे “काश्मीरमधील तरुण इतके का चिडले आहेत ? ते मरण्यासाठी का तयार झाले आहेत ? यावर भारताने देखील विचार करायला हवा. आम्ही दहशतवादावर चर्चा करायला, चौकशी करायला तयार आहोत. हा नवा पाकिस्तान आहे. तुम्ही चर्चा न करताच आम्हाला दोषी कसे ठरवता ?”, असेही यावेळी इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसाम भुकंपानं हादरला, कुठे घरांना तडे तर कुठे भिंती कोसळल्या

News Desk

नीरव मोदींच्या मालमत्तांवर टाच, २० ठिकाणी छापे

swarit

कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे सिद्धरामय्यांची मागणी

News Desk