HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादाचा ‘या’ विधानाने केला भावनिक शेवट

मुंबई | “मी ही केस हरेन किंवा जिंकेन, यासाठी इथे उभा नाही. परंतु, घटनात्मक नैतिकता टिकविण्यासाठी मी इथे उभा आहे”, असे भावनिक वक्तव्य ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) युक्तीवादचा शेवट करताना केला. राज्याच्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवसापासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणावरील सुनावणीचा आजचा (23 फेब्रुवारी) शेवटाचा दिवस होता.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापने केले त्यावेळी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची समीक्षा व्हावी. राज्यपालांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. राज्यपालांना बहुमत नाही हे कसे कळाले. तसा प्रस्ताव आलेला नाही, असा सवालही कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. विरोधक किंवा बंडखोर त्यांच्याकडे गेले असतील तेव्हाच ते कळू शकते, असा प्रश्न विचारला होता. तसेच मी ही केस हरेन किंवा जिंकेन, यासाठी इथे उभा नाही. परंतु, घटनात्मक नैतिकता टिकविण्यासाठी मी इथे उभा आहे. 1950 पासून देशात संविधान रुजवत आलो आहोत. मी येथे त्यासाठी उभा आहे.”

 

सर्वोच्च न्यायालयात आज युक्तीवाददरम्यान काय झाले

सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीदरम्यान राज्यपालांची भूमिका काय होती. यासंदर्भात युक्तीवाद केला. यावेळी जुने विधानसभा आध्यक्ष आणि नवे विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार आणि आमदार अपात्रेसंदर्भात निर्णयावर कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तसेच राज्यपालांनी नियम डावलून शपथ दिल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हणाले. या युक्तीवादावर सर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “शिंदेच्या बंडखोरीनंतर त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही. त्यांच्या बंडखोरीनंतर सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होतो. या सर्व घडामोडींकडे राज्यपाल कसे काय दुर्लक्ष करू शकतात?” यावर कपिल सिब्बल म्हणाले. “34 किंवा 39 लोक राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकतात?, यानंतर राज्यपालांनी शिवसेना म्हणून दर्जा दिला. तसेच दर्जाच नाही तर शपथही दिली.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे”,धनंजय मुंडेंचा भाजपवर वार

News Desk

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र !- बाळासाहेब थोरात

News Desk

‘ओबीसींचा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही’ – जयंत पाटील

News Desk