HW News Marathi
देश / विदेश

भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाजासह पाकिस्तानविरोधी !

नवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे कि, भारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाज आणि पाकिस्तान विरोधी आहे. मी शांततेसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांकडे भारत सरकारने वारंवार दुर्लक्ष केले आहे. मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांबाबत इम्रान यांनी म्हटले कि, “मी सरकारला या प्रकरणाबाबत सद्यस्थितीची माहिती देण्यास सांगितले आहे. हे दहशतवादाशी संबंधित प्रकरण होते. आम्ही हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला आशा आहे कि जेव्हा भारतात निवडणुका होतील तेव्हा या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु होईल.”

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये होता. यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नव्हती, असेही इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. १९८० साली तालिबानी संघटनांच्या विरुद्ध आम्ही अमेरिकेची मदत मागितली होती. परंतु, आम्हाला काय मिळाले ? आमचे ८० हजार लोक मारले गेले. जवळपास साडे दहा लाख करोडचे नुकसान झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#ElectionCommission : जाणून घ्या… पाच राज्याच्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक

Aprna

डीएसकेंना 22 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

Adil

“प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?”, पवार-मोदी भेटीवर राऊतांचा सवाल

News Desk