HW News Marathi
देश / विदेश

भारतीय वायु सेनेने ‘या’ दहशतवाद्यांचा केला खात्मा

नवी दिल्ली | भारतीय वायू सेनेने ‘मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांच्या साहय्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज (२६ फेब्रुवारी) बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. सेनेच्या या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहरही ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा झाला आहे. २००० मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीवरून इंटरपोलने अजहर विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते.

या हल्ल्यात जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहर, भाऊ इब्राहिम अहमदसह हिटलिस्टवर असलेले महत्वाचे दहशतवादी ठार झाले आहेत. या हल्ल्यात अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये ३२५ अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे २५ प्रशिक्षक अशा एकूण ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.

यात प्रामुख्याने मौलाना उमर, मुफ्ती अजहर खान या अतिरेक्यांचा समावेश आहे. अजहर १९९९ मधील भारतीय विमान आयसी ८१४ च्या अपहरणातही सहभागी होता. अजहरच्या विरोधात भारतात अपहरण आणि हत्येचे गुन्हे दाखल होते. भारत सरकारने २००२ मध्ये पाकिस्तानला २० फरार दहशतवाद्यांची यादी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेल्फ कोरोंटाईन करताना या बाबी ठेवा लक्षात

swarit

दोन्ही हातात बंदुका घेऊन दारूच्या नशेत भाजप आमदाराचा नाच

News Desk

सनी लिओनीकडे पॉर्नस्टार म्हणूनचं का पाहिले जाते | हार्दिक पटेल 

News Desk