HW News Marathi
देश / विदेश

पुलावामा जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू-काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांचा कुरापती अजूनही सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात आज (१२ फेब्रुवारी) सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत कोणालाही हानी पोहोचल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. दरम्यान, भारतीय सैन्याने या संपूर्ण परिसराला घेरले असून गोळीबार अजूनही सुरुच आहे.

पुलवामा जिल्ह्यातील रात्नीपोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरु झाली. दरम्यान, सुरक्षा दलांच्या जवानांनी हा संपूर्ण परिसर घेरल्याने दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यदिनी चीनची भारतीय सीमारेषेत घोसखोरी,आयटीबीपीच्या अहवालात माहिती

Gauri Tilekar

आयोध्या प्रकरणावर २९ ऑक्टोबरपासून सुरु होणार सुणावणी

News Desk

#Article370Abolished : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील आज काळा दिवस !

News Desk