HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्न आहे !

नवी दिल्ली | भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधील ३७० हटवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर खडेबोल सुनावले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, “जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर दुसऱ्या देशाने दखल द्यायची गरज नाही, ” असे म्हणत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्ताने काश्मीरचा मुद्यावर संयुक्त राष्ट्र संघाला पत्र लिहिले होते, यासंदर्भात राहुल गांधीने ट्वीट करत पाकिस्तानला फटकारले आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्वीट म्हणाले की, ‘माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात पाकिस्तानसह चीन आणि अमेरिकेलाही इशारा देईल आहे.’

राहुल गांधी यांनी दुसऱ्या ट्वीट म्हटले की, “जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे. कारण जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भडकवले जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक अशी ओळख आहे.” काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला काश्मीरच्या मुद्द्यावर पत्र लिहिले होत. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा या पत्रात उल्लेख होता. यासाठी पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या ट्वीटचा दाखला दिला होता. तसेच या पत्रात जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या ट्वीटचाही उल्लेख करण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर

News Desk

“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”

News Desk

मित्राच्या मदतीने पत्नीवर बलात्कार

News Desk