HW News Marathi
क्रीडा

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

पुणे । “भारताने पाकिस्तानविरूद्ध खेळावे किंवा नाही, हा निर्णय केंद्राने घेऊ दे. आम्हाला त्यांचा निर्णय मान्य असेल”, असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी (२२ फेब्रुवारी)पुण्यात बोलत होते. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये, असा एक मतप्रवाह दिसत आहे. याबाबत अनेक मतभेद आहेत.

‘पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळावे किंवा नाही ?,’ हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला होता. ‘‘मी इतका बुद्धिवान माणूस नाही की या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन. भारताने पाकविरूद्ध खेळावे किंवा नाही, याचा निर्णय केंद्राने घेऊ दे”, असे कपिल देव यांनी यावेळी म्हटले. सिंहगड इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभासाठी पुण्यात आले होते. यावेळी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे, संस्थेचे उपाध्यक्ष रोहित नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

News Desk

रोहित शर्मासह ५ क्रीडापटूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर 

News Desk

“एकीकडे क्रिकेटचा अन् दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे चालू शकत नाही”- रामदेव बाबा

News Desk