HW News Marathi
देश / विदेश

निवडणुका असलेल्या राज्यात केंद्राने खतांचा साठा वळवला; दादासाहेब भुसेंचा केंद्रावर आरोप

मुंबई | केंद्राकडून राज्याला मिक्स फर्टीलायझर प्रकारातील खते कमी प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे राज्यात काही अंशी खत टंचाई दिसून येत आहे. पाच राज्यात होवू घातलेल्या निवडणुका कदाचित केंद्राने तिकडे साठा वाढवल्याने महाराष्ट्रात ही टंचाई भासत असावी, असा आरोप राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केला. कृषिक या कृषी प्रदर्शनाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समवेत भुसेंनी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, राज्याचे प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, राज्याला मिळणाऱ्या एकूण खत साठ्यापैकी ७१ टक्के खते गत पंधरवडा अखेर उपलब्ध झाली होती. ज्या राज्यात निवडणुका होत आहेत. तिकडे साठा वळवल्याने राज्यात टंचाई निर्माण झाली असावी. बियाणे संपन्न महाराष्ट्र अशी ओळख निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने जालना येथे सीड हब निर्माण केले आहे. इतर ठिकाणी अशी हब निर्माण करत कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये यांच्या माध्यमातून बियाण्यांबाबत राज्य स्वयंपूर्ण केले जात आहेत. राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. गतवर्षी निकृष्ट बियाण्याच्या हजारो तक्रारी आल्या होत्या. परंतु, कृषी विभागाने चांगले काम केल्याने यंदा फक्त ४७ तक्रारी सोयाबीनबाबत प्राप्त झाल्या. भाजीपाला, फळझाडे, त्यांची कलमे यांचाही पुरवठा वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आगामी अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूरांच्या हिताचे निर्णय होतील, यात शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात ! | केंद्रीय मंत्र्याचे अजब विधान

News Desk

कौरव टेस्ट ट्यूब बेबी होते !

News Desk

नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस, इंटरपोलने बजावली नोटीस

News Desk