HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला | जयदेव गल्ला

नवी दिल्ली | तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडताना आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे. गल्ला यांनी अंध्रा प्रदेशातील जनतेची व्यथा मांडली. तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाल्यानंतर आंध्र प्रदेशावर कसा अन्याय झाला. याबद्दल गल्ला यांनी लोकसभेत त्यांचे मत मांडले. मूलभूत सोयी-सुविधापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशावर अन्याय झाला आहे.

तेलंगणा राज्य निर्मितीचे विधेयक अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याचे मत गल्ला यांनी लोकसभेत मांडले. आणि हे विधेयक मंजूर करण्यासाठी बळाचा वापर करून संमत केले असा देखील आरोप जयदेव गल्ला यांनी केला आहे. गल्ला लोकसभेत बोलत असताना त्यांच्या या विधानाचा तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच आंध्र प्रदेशच्या जनतेचा मोदी सरकारने विश्वास घात केला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत जनता चोख प्रत्युत्तर देईल. ही धमकी नाही, हा शाप असल्याचे जयदेव गल्ला यावेळी बोलत होते.

 

जयदेव गल्ला यांनी त्यांच्या भाषणात आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहेत. तसेच काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले असा थेट आरोप गल्ला यांनी केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांनी आंध्र प्रदेशाला वाचवण्याची भाषा केली होती. म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होती. परंतु मोदींनी त्यांचे आश्वासन पाळले नाही, असे देखील गल्लांनी यावेळी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

EVMHacking : हॅकर सैयद शुजाने केला टीमच्या ११ जणांच्या हत्येचा दावा

News Desk

#AyodhyaVerdict : न्यायालयाचा निर्णय कुणाची जीत अथवा हार नसेल, शांतता राखण्याचे आवाहन

News Desk

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

News Desk