HW News Marathi
देश / विदेश

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

नवी दिल्ली | राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा (एनआरसी) कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. सध्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात देखील एनआरसी लागू करण्यावरून विरोधकांनी मोठमोठ्या घोषणा दिली. देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आज (४ फेब्रुवारी) लोकसभेमध्ये लिखित उत्तर दिले आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानंतर एनआरसीवर देशभरातील संताप काही अंशी निवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एनआरसीवर लोकसभेत आज विरोधकांच्या प्रश्नाचे उत्तर देणार होते. लोकसभा खासदार चंदन सिंह, नागेश्वर राव यांनी गृहमंत्रालयाला काही प्रश्न विचारले होते. सरकार एनआरसी कायदा लागू करण्याबाबत पावले उचलत आहे का? राज्य सरकारांशी याबाबत चर्चा केली आहे का?, असे प्रश्न विचारले. यानंतर एनआरसीवर लोकसभेत गोंधळ सुरू झाला. या पार्श्वभूमीवर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले होते.

त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर गृहमंत्रालयाने लेखी स्वरूपात एनआरसीसंदर्भात सरकारचे म्हणणे मांडले. या प्रश्नांच्या उत्तरात नित्यानंद राय यांनी लोकसभेत लिखित स्पष्टीकरण दिले. “आतापर्यंत भारत सरकारने संपूर्ण देशभरात एनआरसी कायदा लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

सुरत येथे तक्षशिला इमारतीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू 

News Desk

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी CBIकडे, बिहार सरकारची मागणी पूर्ण

News Desk