HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाचे समन्स

मुंबई | तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचे सांगत भाजप नेत्यांनी बॅनर्जी यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळेच शिवडी न्यायालयाकडून बॅनर्जी यांना समन्स बजावण्यात आले आहे.

ममता बॅनर्जी या गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी बसून म्हंटल्या, तर नंतरच्या दोन ओळी उभे राहून म्हंटल्या आणि राष्ट्रगीत सुरू असताना मधूनच त्या निघून गेल्या, असा आरोप करत भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी मुंबई पोलिसांत बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिवडी न्यायालयाकडून बॅनर्जी यांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी आता २ मार्च २०२२ रोजी बॅनर्जी यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हंटलं आहे की ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताच्या काही ओळी या खुर्चीवर बसून म्हंटल्या. तर काही ओळी उभं राहून म्हंटल्या, तसेच त्यांनी पूर्णपणे राष्ट्रगीताच्या ओळी म्हटल्या नाहीत. ममता बॅनर्जी यांची ही कृती राष्ट्रगीताचा अपमान करणारी आहे, असा आरोप गुप्ता यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादी हल्ल्यात पालघर येथील दोनजण ठार

News Desk

पृथ्वीतलावरून मानवाच्या शेवटाची सुरुवात

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला

swarit