HW News Marathi
Covid-19

….अन् डॉक्टरांशी बोलता बोलता पंतप्रधान मोदी रडले

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटून आला.

यावेळी मोदी म्हणाले की, “मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”

कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. आपल्याला एक होऊन या लाटेचा सामना करावा लागेल. यावेळचा संसर्गदरही अनेक पटीने जास्त आहे. रुग्णांना अनेक दिवस रुग्णालयातच काढावा लागत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे, असंही मोदींनी नमूद केलं आहे.

वाराणसीच्या डॉक्टरांना मोदी म्हणाले, “आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो, पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. आता आपल्याला “जहाँ बीमार, वही उपचार” या मंत्राने काम करावं लागेल”

लसीकरणाचं मोदींचं आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं आहे. लसीच्या संरक्षणामुळे फ्रंटलाईन वर्कर्स सुरक्षित आहेत. हेच सुरक्षाकवच आपल्याला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचं आहे. आपला नंबर आल्यानंतर प्रत्येकाने लस टोचून घ्यावी. लस ही प्रत्येकाची जबाबदारी असून पात्र असणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी असं आवाहन मोदींनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk

राज्यात आज ८,२३२ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk