HW News Marathi
देश / विदेश

काही लोकं दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत, मोदींचा शेती विधेयकावरून टोला!

नवी दिल्ली | केंद्र सरकारने काल (१७ सप्टेंबर) लोकसभेमध्ये पारित करून घेतलेल्या शेतीसंबंधीच्या तीन विधेयकांमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकांना सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही या विधेयकांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. काही लोक दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खरमरीत टोला मोदींनी लगावला आहे. तसेच या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वत:चे पीक स्वत: विकून कमाई वाढवू शकणार आहे. शेतकऱ्यांसाठी आधी जेवढे काम झाले नाही तेवढे काम गेल्या ६ वर्षांत झाले आहे, असा दावा मोदींनी केला आहे.

“शेतकऱ्यांना योग्य किमान आधारभूत किंमत मिळणार नाही अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण त्यांना देशातील शेतकरी किती जागरुक आहे याची कल्पना नाही,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात कृषी विधेयकांवर बोलताना होणाऱ्या आरोपांना उत्तरं दिली. तसंच काँग्रेससह विरोधकांवर टीका केली.

“सरकारी संस्था गहू, तांदूळ इत्यादी शेतकर्‍यांकडून खरेदी करणार नाहीत, अशी खोटी बातमी पसरली जात आहे. हे साफ खोटं आणि चुकीचं आहे. हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदींनी विधेयकांबद्दल शेतकऱ्याचं अभिनंदन करताना शेतकऱ्यांसाठी हे सुरक्षा कवच असल्याचे म्हटले आहे. देशातील काही लोकं जे अनेक दशकं सत्तेत होते, देशावर राज्य केलं ते लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांशी खोटं बोलत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत होते. आपल्या जाहीरनाम्यातही सांगत होते. पण निवडणुकीनंतर विसरुन जात होते,” अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फास्टॅगच्या नियमावलीत केंद्र सरकारकडून बदल

News Desk

मातृत्त्व काही काळासाठी बाजूला सारत देशसेवेसाठी १ महिन्याच्या तान्ह्या मुलासह कामावर रुजू

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल

News Desk