HW News Marathi
देश / विदेश

“अधीर रंजनची अभी ज्यादा हो रहा है…” मोदी लोकसभेत भडकले

नवी दिल्ली | नव्या कृषी कायद्याविरोधातील संघर्ष आता रस्त्यावरून थेट संसदेपर्यंतचा पोहोचला आहे. आज (१० फेब्रुवारी) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा उल्लेख करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच तुटून पडलेत. ”नवीन कृषी कायदे हे प्रत्येकासाठी बंधन नसून पर्याय आहेत, जिथे एक पर्याय आहे, तिथे निषेधाची आवश्यकता नाही”, असंही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय, त्याला कॉंग्रेसच्या अधीर रंजन चौधरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर अधीर रंजन यांच्यावरही मोदी प्रचंड संतापले होते.

कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी कृषी विधेयक कायद्यांविरोधात पाढा वाचायला सुरुवात केली. तेव्हा मोदींनी थेट हस्तक्षेप केला. यावर मोदी प्रथम हसले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अधीर रंजन शांत न झाल्यानं मोदीसुद्धा संतापले. ”आवाज आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न हा विचार गोंधळ घालण्याच्या धोरणाचा भाग आहे. धोरणे म्हणजे आवाज वाढवणे अन्यथा खोटेपणा आणि अफवा उघडकीस येतील, सत्य बाहेर येईल आणि त्यांच्यासाठी गोष्टी कठीण होतील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. आपण लोकांचा असा विश्वास जिंकू शकणार नाही”, असंही मोदींनी विरोधकांना सुनावलं.

यावर अधीर रंजन चौधरी उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा गडबड सुरू केली. मग पंतप्रधान मोदी म्हणाले, अधीर रंजनजी हे आता जास्तच होतंय. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला बंगालमध्ये टीएमसीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळेल. काळजी करू नका. तुम्ही असे का करीत आहात मला माहीत आहे?, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत अधीर रंजन चौधरी यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत. कृषी कायदे अध्यादेशाद्वारे आणि नंतर संसदेत पारित केले गेले. या कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर कोणतीही मंडळे बंद करण्यात आली नाहीत, एमएसपी देशात कुठेही संपला नाही. हे एक सत्य लपवलं जातंय. कायदे तयार झाल्यानंतर एमएसपीवरील खरेदी वाढल्याचंही मोदी म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना भेटणार

News Desk

आझम खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल

News Desk

मी नव्हे तर ‘तो’ नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असेल !

News Desk